संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी करायची असेल तर लवकरात लवकर करा. पण, जर आरोप खोटे ठरले तर काय कराल हे ही सरकारने स्पष्ट करावं असं म्हणत पत्राचाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला आव्हान देत प्रतिक्रिया दिली. पत्राचाळ घोटाळा नवीन खुलासे होत असतानाच ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहभागाची कालबद्ध मर्यादेत चौकशी करावी अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
पत्राचाळीच्या भ्रष्टाचाराचा आवाका पाहाता हे प्रकरण फक्त संजय राऊत यांना झेपणारे नसून पत्राचाळ प्रकरणात शरद पवार यांच नाव अतुल भातखळकर यांनी घेतलं होतं. तसेच यासंबधी एका ट्वीटमध्ये पत्राचाळ प्रकरणी ‘राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची चौकशी व्हावी, ईडी च्या आरोपपत्रात हे नाव आहे. वन अँड ओंली वन शरद पवार. याप्रकरणी तत्काळ चौकशी व्हावी,’ असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं होतं.