Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

इस्टेट इन्व्हेंस्टमेंट कंपनीच्या जाचातून मिरा भाईंदरकरांची होणार कायमची सुटका?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सभागृहात सकारात्मक उत्तर

मात्र आमच्या प्रयत्ना मुळेच हा प्रश्न सुटला असा दावा आमदार नरेंद्र मेहता यांनी देखील केला असून श्रेय घेण्यासाठी आमदार व मंत्री यांच्यात झुंपली?

भाईंदर / प्रतिनिधी:
लाखो मीरा भाईंदरकर नागरिकांची ‘इस्टेट इन्व्हेंस्टमेंट कंपनी’च्या जाचातून कायमची सुटका होण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने गंभीरपणे पावले टाकली आहेत. मिरा भाईंदरचे स्थानिक आमदार व राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना व पाठपुराव्याला यश आले असून याबाबत आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक उत्तर दिले. मिरा भाईंदरच्या लोकांना इस्टेट इन्व्हेंस्टमेंटचा जो काही जाच आहे तो सोडविण्याकरिता राज्य सरकारकडून आपण निश्चितपणे प्रयत्न करीत आहोत, त्यादृष्टीने निर्देश देण्यात आलेले आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर देत तसे निर्देश दिल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांना दिली.

मिरा भाईंदरच्या इस्टेट इन्व्हेंस्टमेंट कंपनीचा विषय आज विधानसभा अधिवेशनात चर्चेस आला. स्थानिक आमदार व मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रश्नावर राज्य सरकारचे लक्ष वेळोवेळी याआधी वेधले होते.

आज सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना सांगितले की, इस्टेट इन्व्हेंस्टमेंट कंपनीचा विषय आज सभागृहात मांडण्यात आला आहे. या संदर्भात सरकारने एक कमिटी २०२४ मध्ये बनवली होती त्या कमिटीने सरकारला एक अहवाल दिला आहे. त्या अहवालाच्या अनुषंगाने सरकारने असा निर्णय घेतला आहे की, आतापर्यंत असे होते कि इस्टेट इन्व्हेंस्टमेंटची ना-हरकत मिळाल्याशिवाय आपण पुढचे काय करत न्हवतो. आता इस्टेट इन्व्हेंस्टमेंटच्या ना-हरकतीला अधीन राहून आपण सगळ्या प्रकारच्या परवानग्या देत आहोत. इस्टेट इन्व्हेंस्टमेंटची ना-हरकत (एनओसी) याकरिता घ्यावी लागते कारण त्यासंदर्भात कोर्टात एक केस सुरु आहे, कोर्टाने एक निकाल दिलेला आहे. परंतु त्याहीसंदर्भात आता आपल्या वरिष्ठ सचिवांना सांगितले आहे कि या केसचा फॉलोअप करून, याठिकाणी हि केस निकाली काढणे आणि हा ‘स्टे’ त्याठिकाणी हटविणे यासंदर्भातील निर्देश विभागाला देण्यात आलेले आहेत, त्यामुळे निश्चितपणे विशेषतः मिरा भाईंदरच्या लोकांना इस्टेट इन्व्हेंस्टमेंट कंपनीचा जो जाच आहे तो सोडविण्याकरिता आपण निश्चितपणे प्रयत्न करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याबाबत परिवहन मंत्री सरनाईक यांनी समाधान व्यक्त केले आहे.

असे असेल तरी हे प्रकरण आम्ही लावून धरल्यामुळे आता इस्टेट इन्व्हेस्टमेंटच्या जाचक अटीतून मिरा भाईंदरकरानां सुटका मिळणार असा दावा मिरा भाईंदर शहराचे 145 विधानसभा मतदार संघाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी केला आहे.
त्यामुळे इस्टेट इन्व्हेस्टमेंट या प्रकरणात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यात नेहमी प्रमाणे श्रेय घेण्याची चढाओढ लागली असल्याचे दिसून येत आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *