संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
खासगी वाहन धारकांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. तुमच्याकडे जर तुमची स्वत:ची कार असेल तर, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सध्या राज्य शासनाकडून खासगी वाहनधारकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. कारण राज्य सरकारने खासगी वाहनधारकांची टोलटॅक्स माफीचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच, आता महामार्गांवरून प्रवास करताना तुम्हाला टोल टॅक्स अर्थात टोल नाक्यांवरील टोलवसुलीचा फारसा ताण घेण्याची आवश्यकता नाही.
कमर्शियल वाहनांवरील टोलवसुली मात्र कायम राहणार आहे. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व महामार्हांवर आता फक्त व्यावसायिक वाहनांकडून टोल आकारला जाईल. एमपीआरडीसी ने यासाठीचे टेंडरही प्रसिद्ध केले आहे. कारण, हा नियम राजस्थान सरकारडून लागू करण्यात आला आहे.
सर्वसामान्यांना होणाऱ्या अडचणी पाहता राजस्थान प्रशासनानं महत्त्वाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला. गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीनंतर सदर निर्णयाच्या धर्तीवर टेंडर करण्यात आले. पुढील महिन्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार असून, टोल ब्लॉक सुरु होणार आहेत.
राजस्थान मध्ये घेण्यात आलेला हा निर्णय पाहता महाराष्ट्रात याच धर्तीवर कोणता निर्णय घेतला जाणार का, हाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रातही मागील कैक वर्षांपासून टोल वसुलीच्या मुद्द्यावरून नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. तेव्हा प्रशासन आता नागरिकांना दिलासा देणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल.
कोणाला नाही भरावा लागणार टोल ?
राजस्थान सरकारनं काही असे विभागही केले आहेत ज्यांना टोल माफी देण्यात आली आहे. सरकारी वाहनांपासून शव नेणाऱ्या वाहनांसह एकूण २५ प्रकारच्या वाहनांना यातून वगळण्यात आलं आहे. लोकप्रतिनिधींच्या वाहनांचाही यात समावेश असेल असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले आहे.