Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अतिवृष्टीग्रस्त नागरिकांची व नुकसानग्रस्त पिकांची पाहणी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांची आणि नुकसानग्रस्त शेतीची पाहणी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याठिकाणी भेट देऊन केली तसेच अतिवृष्टीग्रस्तांशी संवाद साधला.

भाजपा नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार आदी त्यांच्यासोबत होते. वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट मधील कान्होली या गावाचा पुरामुळे संपर्क तुटला होता. अतिवृष्टीग्रस्तांना ग्राम पंचायातीमध्ये ठेवण्यात आले आहे. गावाला भेट देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

अतिशय कठीण परिस्थितीमध्ये लोकांना वाचविण्याचे काम शासकीय यंत्रणांनी केले आहे आणि अजूनही ते करीत आहेत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले. दुबार पेरणी सुद्धा संकटात आली आहे, शेतकऱ्यांना योग्य मदत राज्य सरकारतर्फे दिली जाईल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली व त्यांनी पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेत त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पूरग्रस्त आणि अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांची विचारपूस केली तसेच नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *