Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विकास प्रकल्पांकडे नगरविकास खात्याचे दुर्लक्ष ; भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. रवींद्र चव्हाण यांचा आरोप..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रासाठी मंजूर केलेल्या विकास प्रकल्पांकडे नगरविकास खाते दुर्लक्ष करत आहे. या कारभाराविरोधात आपण पावसाळी अधिवेशनापूर्वी एमएमआरडीए कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत, अशी घोषणा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ. रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते.

आमदार चव्हाण म्हणाले की, कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कोट्यवधींचा निधी जाहीर करण्यात आला. कल्याण -डोंबिवली क्षेत्रात सिमेंट रस्ते बांधण्यासाठी फडणवीस सरकारने १५० कोटींची तरतूद केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने विकासात राजकारण आणत रस्त्यांचे हे प्रकल्प रद्द केले.

सर्वाधिक वाहतूक कोंडीचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण – शीळ हा रस्ता ६ पदरी करून या रस्त्यावर एलिव्हेटेड पद्धतीने मेट्रो सुरु करण्याची मागणीही आ. रवींद्र चव्हाण यांनी केली. ते म्हणाले की, नगरविकास विभाग कल्याण-डोंबिवली क्षेत्राकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल आपण यापूर्वीही अनेकदा आवाज उठवला होता. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रशासकावर नगरविकास विभागाचे नियंत्रण आहे. विकास प्रकल्पांबाबत प्रशासक आणि नगरविकास विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाच्या सुस्ततेमुळे अनेक प्रकल्प रखडले आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर नगरविकास विभागाने या क्षेत्रातील विकास प्रकल्पांकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबले आहे.

डोंबिवलीहून नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीत मोठी वाढ झाल्याने या मार्गावर मिनी मेट्रो सुरु करावी, मोठ्या टाऊनशिपमधील रहिवाशांना करात सवलत द्यावी अशा मागण्याही आ.रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केल्या.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *