Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश

कोकणातील चिपळूणच्या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी जन संग्राम संस्थेचे भरीव कार्य

संपादक: मोईन सय्यद/मीरा भाईंदर प्रतिनिधी

जुलैमध्ये आलेल्या महापुरात कोकणातील अनेक जिल्ह्यातील शेकडो गावं पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे हजारों कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहेत. अशाच प्रकारे कोकणातील चिपळूण मधील हजारो कुटुंब बाधित होऊन उध्वस्त झाले आहेत.

चिपळूणमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खारीचा वाटा म्हणून जन संग्रामचे अध्यक्ष सुहास सावंत यांच्या नेतृत्वाखाली तांदूळ, दाळ, बटाटे, साखर, चहा पावडर, तेल, फिनाईल, साबण तसेच महिला आणि मुलींसाठी साडी, पंजाबी असे कपड्याचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी जन संग्रामच्या रुची मोरे, मांडवी दुबे, तृप्ती सावंत, यश मोरे, ऋषभ साठे, समीर देसाई, अखिल ब्राम्हण प्रतिष्ठाणचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेशजी पांडे, महिला अध्यक्ष सुषमा मिश्रा, गुरुब्रम्हांचे संजय वरेकर, सुधीर आठले, चिपळूणचे दाबके आणि सुनील कुलकर्णी यांनी उपस्थित राहून पूरग्रस्तांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम केले.
जन संग्रामच्या या मदत कार्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *