Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

पतीला सोडून राहणाऱ्या महिलेची हत्या करणाऱ्या प्रियकराला दीड महिन्यानंतर अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पतीला सोडून प्रियकराशी लग्न करण्याचा निर्णय घेणाऱ्या महिलेची हत्या करणाऱ्या प्रियकराला उल्हासनगर हिल लाईन पोलिसांकडून दीड महिन्यानंतर अटक करण्यात आली आहे. नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत राहणाऱ्या ३७ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या झाल्याची घटना ७ नोव्हेंबर रोजी घडली होती. ही घटना अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी फाटा परिसरातील एका चाळीत घडली. खळबळजनक बाब म्हणजे मृत महिला ज्या व्यक्ती सोबत राहत होती, त्यानेच तिची हत्या करून पळ काढल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला होता. याप्रकरणी उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध पोलीसांनी सुरु केला असता, दीड महिन्यानंतर पोलीसांना आरोपीला बेड्या ठोकण्यात यश आले आहे. वैभव देवकाते असे बेड्या ठोकलेल्या आरोपीचे नाव आहे. तर लक्ष्मीबाई मनोहर तायडे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

शेजाऱ्यांना आढळून आला मृतदेह

मृत महिला दोन महिन्यापूर्वी आरोपी प्रियकर वैभव सोबत अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी फाटा भागातील साईबाबा चाळीतील भाड्याच्या घरात राहण्यास आली होती. ती मूळची अकोला जिल्ह्यातील पिंपळखुंटे गावात राहणारी होती. त्यातच मृतक महिला लक्ष्मीबाई मनोहर तायडे आरोपी वैभवकडे सतत लग्नाचा तगादा लावत होती. यामुळे दोघांमध्ये वादही होत होते. असाच वाद ७ नोव्हेंबर रोजी झाला होता. त्याच पहाटेच्या सुमारास तिची चाकूने गळा चिरून घरताच निर्घृण हत्या केली गेली. सकाळी सात वाजल्याच्या सुमारास तिचा मृतदेह ती राहत असलेल्या घरात शेजाऱ्यांना आढळून आला. मात्र तिच्यासोबत रहाणारा वैभव पसार झाला होता.

आधी साडीने तिचा गळा आवळला, नंतर चाकूने  गळयावर केले सपासप वार

घरात खून झालेल्या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी हिललाईन पोलिसांना देताच पोलीस पथक काही वेळातच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत लक्ष्मीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगर मधील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात रवाना केला. मृतदेहाच्या अहवालात आदी साडीने तिचा गळा आवळला नंतर चाकूने गळयावर वार करून तिची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर हिल लाईन पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून वैभवचा पोलिसांनी कसून तपास सुरू केला.

औरंगाबाद शहरातून दीड महिन्यानंतर अटक

तपासा दरम्यान वैभव देवकाते हा याच भागातील एका बांधकाम साईटवर वाहनचालक असल्याचे पोलीसांना समजले. पोलीसांनी आरोपीची अधिकाअधिक माहिती गोळा करून त्याच्या शोध घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पडवळ, गुन्हे प्रकटीकरणं टीमचे सुभाष घाडगे, बाबू जाधव, बडे आणि प्रमोद लोंढे या पोलीस पथकाची नेमकणूक करण्यात आली. मात्र आरोपी हा वेळोवेळी राहण्याचे ठिकाण बद्दल असल्याने पोलीसांना गुंगारा देत होता. त्यातच पोलीस पथकाला गुप्त बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी वैभव हा औरंगाबाद शहरात असल्याची माहिती मिळताच, पोलीस पथकाने औरंगाबाद शहरातून दीड महिन्यानंतर वैभव देवकाते याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. ह्या घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे करत आहेत असे प्रसिध्दी माध्यमांना सांगण्यात आले.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *