Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

गडकरींची मोठी घोषणा ! पुढील वर्षापासून कारमध्ये ‘सहा’ एअरबॅगची अंमलबजावणी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय आता लांबणीवर पडला आहे. पुढील वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे वाहन उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आठ आसनी कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय लागू करण्यात आला. हा निर्णय १ ऑक्टोबर २०२२ पासून लागू होणार होता. पण आता या निर्णयाची अंमलबजावणी एक वर्ष लांबणीवर गेली आहे. आता १ ऑक्टोबर २०२३ पासून कारमध्ये सहा एअरबॅग्ज बसवण्यात येणार आहेत.

निर्णय लांबणीवर ?
नितीन गडकरी यांनी ट्विट करून आपल्या निर्णयाची माहिती दिली. वाहन उद्योग सध्या मागणी-पुरवठा साखळीतील आव्हानांना तोंड देत आहे. या समस्यांचा परिणाम वाहन उद्योगावर होत आहे. हे लक्षात घेऊन पुढील वर्षापासून वाहनांच्या एम-१ श्रेणीत सहा एअरबॅग्ज लागू करण्यात येणार आहेत.

किंमतीत वाढ ?
कारमधील एअरबॅगची संख्या वाढल्याने कारच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जर कार सहा एअरबॅगसह आली तर कारची किंमत ३० हजार ते ४० हजारपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

एअरबॅगची गरज काय ?
भारतात कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य केल्या असत्या तर सध्या १८ दशलक्षाहून अधिक एअरबॅगची गरज पडली असती. सध्या देशात ६ दशलक्ष एअरबॅग तयार होतात. याचा अर्थ देशात जवळपास १२ दशलक्ष एअरबॅगचा तुटवडा आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *