आपलं शहर महाराष्ट्र

लॉकडाऊनमुळे नोकरी गेली, मुलींवर आली वेश्या व्यवसायाची नामुष्की, वसईतील दुर्दैवी घटना!

वसई-विरार, प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून जीवनाचा चरितार्थ कसा चालवायचा असा प्रश अनेकांना पडला असताना काही असामाजिक तत्व मात्र असहाय्य महिलांच्या मजबुरीचा फायदा उचलून आपल उखळ पांढर करून घेत असल्याचे पोलीस तपासात उघड झाल आहे. वसईमध्ये वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या महिलेला अनैतिक मानवी वाहतूक शाखेने सापळा रचून एका महिला आरोपीला अटक करून पीडित मुलींची सुटका केली आहे.

वसई पूर्वेकडील रेंज नाका येथे मुंबईतून वसईत येवून मुली पुरवत असल्याची खबर अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार प्रकाश निकम यांना माहीती मिळाली होती. अरुणा चौहान नावाची वेश्या पैसे घेवून मुली पुरवते अशी माहिती निकम यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांना दिली. पोलीस उपआयुक्त प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे सहाय्यक फौजदार प्रकाश निकम पोलीस हवालदार बापु पवार, सुनिता कांटेला ,पोलीस नाईक रोशन किणी , महेंद्र शेट्ये ,विशाल कांबळे , पुनम जगदाळे , काजल पाटील,राजेश निवृत्ती पदमने यांच्या पथकाने सापळा रचून अरुणाला अटक केली.

कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांना आपल्या रोजीरोटीला मुकावे लागले अनेक कंपन्या बंद झाल्याने महिला बेरोजगार झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. आपला संसाराचा गाडा हाकण्यासाठी मिळेल ते काम करण्याची नामुष्की ओढवली असल्याने त्या मजबुरीचा फायदा उठवून वेश्या दलाल अरुणा हिने अशा महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात ओढले. या दोन्ही पीडित मुली एका कंपनीत कामाला जात होत्या. मात्र, ते काम बंद झाल्याने आपला संसाराचा गाडा चालवायचा कसा अशा विवंचनेत असताना त्यांची ओळख अरुणाशी झाली. तिने ‘आपण मुंबईत धंदा न करता वसईमध्ये करूया, तिकडे तुम्हाला कोणी ओळखणार नाही’ असे सांगून पैशाचे आमिष दाखवून आणल्या होत्या.

शेवटी पोटापाण्याचा प्रश्न असल्याने त्या तयार झाल्या होत्या. मुंबईत राहणाऱ्या वेश्या दलाल महिलेने फोनवर ग्राहकांशी संपर्क साधून ग्राहकांच्या मागणी नुसार, मुली पुरवण्याचे काम करीत असल्याची बातमी प्रकाश निकम यांना मिळताच त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदशर्नाखाली एका सामाजिक संस्थेची मदत घेत एका बोगस गिऱ्हाईकाने वेश्या अरुणा हिला फोन करून मुलीची मागणी करायला सांगितले. अरुणाने एका मुलीचे 2000 रुपये सांगितले. त्यानंतर वसईच्या फादरवाडी येथील कृष्णा उडपी हॉटेलकडे भेटण्यासाठी बोलावले. अरुणा 2 मुलींना घेवून रिक्षाततून आल्या आणि कृष्णा उडप्पी येथे आल्या असता आणलेल्या दोन मुलींपैकी एका मुलीची निवड करण्यास सांगितली. त्याप्रमाणे बोगस गिऱ्हाईकाने एका मुलीस पसंत केले व ठरल्याप्रमाणे व्यवहाराचे 2000 रुपये अरुणाकडे दिले. आणि खात्री झाल्यानंतर अनैतिक वाहतूक शाखेचे दबा धरून बसलेल्या पोलिसांनी दलाल अरुणा व 2 पीडित मुलींना ताब्यात घेतले.

अरुणा ही मुंबई सायन हून त्या दोन पीडित मुलीना घेवून आली होती. दलाल महिला ही फोनवरून गिऱ्हाईकांना संपर्क करून त्यांच्या मागणीनुसार, मुली पुरवत असल्याची कबुली तिने पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा करून 2 पीडित मुलींची सुटका करून त्यांची रवानगी महिला सुधारगृहात केली आहे.पुढील तपास वालीव ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद करोडीवाल करीत आहेत.

कोरोना महामारीच्या काळात संसाराचा गाडा कसा हाकायाचा या विवंचनेत असलेली सामान्य वर्गातील जनता आता पोटापाण्यासाठी वाम मार्गाला जाण्यासाठी मजबूर झाली आहे हे यावरून दिसत असून सरकारने जनतेच्या रोजगाराचा प्रश्न लवकरच सोडविला नाही तर देशात अराजकता माजेल अशी भिती सामाजिक कार्यकर्ते यांनी वर्तविली आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *