Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

परिसरातील नागरिकांचे आरोग्य ‘ट्विन टॉवर’च्या धुळीने धोक्यात..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार रविवारी बहुचर्चीत ‘ट्विन टॉवर’ इमारत भुईसपाट झाली. हे टॉवर पाडण्यासाठी साढे ३ हजार किलोपेक्षा जास्त स्फोटकांचा वापर करण्यात आल्याचे आणि या टॉवरचा मलबा हटविण्यासाठीच तीन महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे ‘डिस्ट्रॉलेशन फर्म एडिफिस इंजिनिअरिंग’ च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हे टॉवर पाडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धुळीचे लोट निर्माण झाले होते, आणि ही धूळ मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहे. धुळीमुळे परिसरातील नागरिक श्वसनाच्या रोगांना बळी पडण्याची शक्यता वाढली आहे.

दम्याचा त्रास उदभवू शकतो

या परिसरातील ज्या नागरिकांना दम्याचा त्रास आहे त्यांची आणखी काळजी घ्यावी लागणार आहे. इतकेच नव्हे तर निरोगी व्यक्तीलाही खोकला, धाप लागणे तर या प्रदूषणामुळे श्लेष्माची देखील समस्या निर्माण होऊ शकते वायू प्रदूषणामुळेही परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

बुरशीजन्य संसर्गात वाढ

ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांना धुळीमुळे दम्याचा त्रास तर होतोच पण श्वसनांच्या आजाराबरोबर त्यांना बुरशी जन्य संसर्ग देखील होण्याची शक्यता आहे. बुरशीचा संसर्ग प्रामुख्याने फुफ्फुसांवर होतो, बुरशीच्या बीजाणूंचा श्वास घेतल्यामुळे छातीत दुखणे, खोकला, डोकेदुखी, भूक न लागणे, श्वास लागणे, सांधे आणि स्नायू दुखणे, थंडी वाजणे असे विकार उद्भवतात.

यावर उपाययोजना काय ?

धुळीच्या त्रासापासून स्वत:ला दूर ठेवायचे असेल तर, आता ‘ट्विन टॉवर’ च्या परिसरापासून काही दिवस दूर राहणे गरजेचे आहे. शिवाय त्या इमारतीपासून जवळपास असणाऱ्या नागरिकांनी कायम आपल्या घराची दारे-खिडक्या ही बंद ठेवणे गरजेचे आहे. आवश्यक असेल तेव्हाच खिडक्या आणि दारे उघडावीत असा सल्लाही सभोवतालच्या रहिवाश्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर देण्यात आला आहे.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *