Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी केंद्राकडे शिफारस करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ वा जयंती महोत्सवाचा कार्यक्रम चेंबूर येथे पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करुन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अण्णाभाऊ साठे हे क्रांतिकारक होते. त्यांनी देश हितासाठी काम केलं. अण्णाभाऊ साठे महामंडळ सक्षम करण्याचं काम सरकार करणार आहे. अण्णाभाऊंच्या कार्याला साजेसं स्मारक उभारण्यासाठी राज्यसरकार युद्ध पातळीवर काम करेल. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा, यासाठी केंद्राकडे शिफारस करू, असं आश्वासन शिंदे यांनी यावेळी भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दिले.

त्यांचं प्रमाणे वीना तारण कर्ज योजना त्वरित चालू करणार असे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. चेंबूर येथील अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मातंग समाज दिलेला शब्द फिरवत नाही, हा अनुभव मला ठाण्यात आलाय. आमचं सरकार सर्व सामान्यांचे सरकार आहे. बाळासाहेब ठाकरेंचीच भूमिका पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतोय. मधली अडीच वर्षे सोडा, आता खऱ्या युतीचं सरकार आलंय. जे थांबलय ते पुढे नेऊ. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचंही आपल्याला सहकार्य आहे. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावं, यासाठी केंद्राकडे शिफारस करणार आहोत. अण्णाभाऊ साठे हे क्रांतिकारक होते. त्यांनी देश हितासाठी काम केलं आहे.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *