Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

७ वर्षांपासून स्वतःचे अस्तित्व लपवून फरार असलेला आरोपी कल्याणच्या गुन्हे शाखा घटक-३ ने सापळा रचून शिताफीने केला अटक..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाणे येथे गु.रजि.नं. ८४७/२०१४ भादवि कलम ४२०,४६७,४६८,४७१,४०६,३४ प्रमाणे दि.२१/११/२०१४ रोजी गुन्हा दाखल होता. गुन्ह्यातील गेले ७ वर्षांपासून स्वतःचे अस्तित्व लपवून फरार असलेला तसेच मा.न्यायालयाने जाहीरनामा काढून त्याची लखनऊ येथील १.७५ करोड रुपयांची प्रॉपर्टी जप्त करून लिलावाच्या आदेश दिल्यानंतरही हजर न झालेला गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी नामे माजिदअली उर्फ गुड्डू मन्सूरअली शेख रा. ए/३, चाळ नं.१०३, हिंदुस्थान चाळ, कामराजनगर, व्ही.एन.मार्ग घाटकोपर (पूर्व) मुंबई – ७७, याचा गुन्हे शाखा, घटक-३ कल्याण कडून समांतर तपास सुरू असताना नमूद फरारी व पाहिजे असलेल्या आरोपी बाबत पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदारा मार्फत माहिती काढून गोपनीय रित्या त्याचा मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषणावरून तो तिरुपती अपार्टमेंट ए/१०५, सेक्टर २०, कामोठे, नवी मुंबई या परिसरात राहत असले बाबत खात्रीशीर माहिती काढून त्याचा सध्याचा फोटो प्राप्त करून सापळा रचून त्याचा शोध घेवून पाहिजे आरोपी माजिदअली उर्फ गुड्डू मन्सूरअली शेख यास काल दि.१८/०८/२०२१ रोजी ताब्यात घेवून महात्मा फुले चौक पोलीस ठाणे येथे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी ताब्यात देण्यात आला आहे. प्रस्तुत गुन्ह्यातील यापूर्वी अटक आरोपी पैकी मा. न्यायालयाने एक आरोपीस ३ वर्षे कैद व दुसऱ्या आरोपीस ५ वर्षे कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.

तसेच नमूद आरोपी याचे विरुद्ध १) महात्मा फुले चौक पो.स्टे. गु.रजि.नं. ८३९/२०१४
२) महात्मा फुले चौक पो.स्टे. गु.रजि.नं. ८६४/२०१४ भादवि कलम ४२० प्रमाणे २ गुन्हे दाखल आहेत.
तसेच खोडारे पोलीस ठाणे जिल्हा गोंडा उत्तरप्रदेश येथील गु.रजि.नं. १५७/२०१६ भादवि कलम ३०७,३२६,५०४,५०६,३४ या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

प्रस्तुत गुन्ह्याच्या तपासाची कामगिरी मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-३, कल्याणचे पोलीस निरीक्षक श्री.विलास पाटील, सपोनि भूषण एम.दायमा, पोउनि मोहन कळमकर, सपोउनि साळुंखे, विलास मालशेटे, दत्ताराम भोसले, सचिन साळवी, राजेंद्र खिलारे, मंगेश शिर्के, सुरेश निकुळे, प्रकाश पाटील, हरिश्चंद्र बांगारा, पोशि अजितसिंग राजपूत, सचिन वानखेडे, मिथुन राठोड, गुरुनाथ जरग, गोरक्ष शेकडे, राहुल ईशी यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *