Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

इकडे सरकार कोसळले आणि आदित्य ठाकरेंचा काही महिन्यांपूर्वी बांधलेला पूल गेला पुरात वाहून तिकडे..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शेंद्री पाडा येथे काही महिन्यांपूर्वीच लोखंडी पूल उभारला होता त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुसळधार पावसाची संततधार सुरु असल्याने नद्या, नाले,ओहोळ, अगदी गटारीसुद्धा दुथडीभरून वाहत आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण झाली आणि याच पुराच्या पाण्यात हा लोखंडी पूल वाहून गेला आहे यामुळे येथील महिलांना पुन्हा एकदा लाकडी बल्ल्यांवरून पाण्याची हंडे घेऊन जाण्याची कसरत करावी लागत आहे.

पंचक्रोशितील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार येथे लोखंडी पूल देखील उभारण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांनी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या पुलचे उदघाटनही झाले होते मात्र पहिल्याच पावसात पुलाने अखेरचा श्वास घेतला हे दुर्दैव.

हा पुलचं वाहून गेल्याने महिलांना पुन्हा लाकडी बल्ल्यावरून प्रवास करावा लागत आहे.म्हणून तिकडे सरकार कोसळले आणि इकडे आदित्य ठाकरेंनी उभारलेला पूल पुरात वाहून गेल्याची चर्चा त्र्यंबकवासीयांमध्ये आहे हे खरं.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *