Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

जगातील सर्वच क्षेत्रात ब्राह्मणांची उत्तुंग भरारी – देवेंद्र फडणवीस


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जेव्हा लढण्याची वेळ आली तेव्हा हाती तलवार घेतली आणि समाजाला सुधारकांची गरज असताना सुधारकांचे काम केले. जगातील प्रत्येक क्षेत्रात ब्राह्मणांचे योगदान असून ब्राह्मणांनी सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण उद्योजकांच्या परिषदेत डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले सभागृह सांगितले. ‘ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल’च्या मुंबई विभागातर्फे डोंबिवलीतील उद्योजकांच्या दिनांक १२ व १३ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तिथे राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या परिषदेला देशाच्या विविध भागातून ७०० हून अधिक ब्राह्मण उद्योजक उपस्थित होते. रविवारपासून ब्राम्हण उद्योजकांची दोन दिवसीय परिषद डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिरात आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुणवंत उद्योजकांना ‘उद्यम जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, मुकुंद कुलकर्णी, अरविंद कोऱ्हाराळकर, महेश जोशी, श्वेता इनामदार, मकरंद पुंडलिक, अरविंद नांदापूरकर, विवेक वामोरकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कडोंमपा आयुक्त भाऊसाहेब दांगडे, अभिनेते प्रशांत दामले उपस्थित होते.

ब्राह्मण समाजाने समाजाला वेळोवेळी दिशा देण्याचे काम केलेलं आहे ब्राह्मण समाजाच्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्या निस्वार्थीपणे काम करीत आहेत त्याबद्दल मला अभिमान वाटतो. ज्यावेळी लढण्याची वेळ आली त्यावेळी हाती तलवार घेत आणि ज्यावेळी समाजाला सुधारण्याची वेळ आली त्यावेळी सुधारकाचे काम केले. प्रसंगी आपल्याच समाजाच्या माणसासमोर उभे राहण्याला ते कधीच कचरले नाहीत. आता स्टार्टअप पासून ते मोठ्या उद्योग व्यवसाय पर्यंत ब्राह्मण समाजाने प्रगती केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण जगातील आर्थिक क्षेत्रांमध्ये पाचव्या स्तरावर आहोत २०३० साली आपण तिसऱ्या क्रमांकावर येऊ असा आशावाद यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

देशातील दूरसंचार क्रांतीमुळे नवे नवे व्यवसाय उभे राहिले असून या नव्या व्यवसायांना आपण समजून घेतले पाहिजे. ब्राह्मण समाजामध्ये विशेषता तरुणांमध्ये शिक्षणाच्या व रोजगाराच्या बाबतीत कमतरता व्यक्त केली जाते. ही कमतरता दूर करण्याचे काम समाजाने केले पाहिजे जगामध्ये खूप संधी उपलब्ध आहेत हे समजून सांगणारं कुणीतरी हवं. देश वेगाने प्रगती करत असताना ब्राह्मण समाजाने मोठे योगदान देशांमध्ये दिलेला आहे त्याच पद्धतीने यापुढेही ब्राह्मण समाजाने देशात आपले योगदान द्यावे. जगातील सात महत्वपूर्ण उद्योग कंपन्यांमधील चार कंपन्यांचे मुख्य अधिकारी हे ब्राम्हण समाजातील असल्याचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आवर्जून उल्लेख केला. विदेशातील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात ब्राम्हण वर्गाची सरशी असून बाकरवडी ते मद्य निर्मितीपर्यंत साऱ्या क्षेत्रात ब्राम्हण उद्योजकांनी भरारी घेत देशाच्या उद्योग आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लावत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिषदेत बोलून दाखविले.

बीबीएनजी सारख्या संस्था शासनाकडे कधी काही मागत नसून त्या स्वयंभू असून त्यांचे कौतुक करत सरकार म्हणून अश्या संस्थांना गरजू व्यावसायिक, मार्गदर्शन, शिक्षण, रोजगार संधी याविषयी काही मदत साहाय्य हवे असल्यास आपण ते व्यक्तिशः आणि सरकार म्हणून मदत करू असे आश्वासन तेथील उपस्थित उद्योजकांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ज्या तरुणांना परदेशामध्ये उच्च शिक्षण घ्यायचे आहे त्यांच्यासाठी शिष्यवृत्तीची योजना सुरू केली आहे असेही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *