आपलं शहर

डोंबिवली पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर उड्डाण पुलाचे ७ गर्डर चढविण्याचे काम पूर्ण..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाण पुल धोकादायक झाल्यामुळे १५ सप्टेंबर २०१९ पासून वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. सदर पुल बंद असल्याने नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी कोविड-१९ च्या संचार बंदीच्या काळात रेल्वे सेवा बंद असताना उड्डाण पुल पुर्नबांधणीचे काम महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशाने तातडीने हाती घेण्यात आले आणि १७ एप्रिल रोजी रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. दि. २२.०३.२०२१ रोजी १५ मिटरचे ७ गर्डर बसविण्यात आले आणि दि. २ एप्रिल रोजी १२ मिटरचे आणखीन ७ गर्डर बसविण्यात आले आणि आज दि.०३.०५.२०२१ रोजी तिसऱ्या व शेवटच्या स्‍पॅनचे १८ मिटरचे ७ गर्डर चढविण्याचे काम पूर्ण करण्यात आले.


राजाजी पथवरील स्पॅनचे कामाकरीता दि.०७.०५.२०२१ पर्यत वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. सदर गर्डर्स चढवून झाल्यानंतर क्रॉस गर्डर्स जोडण्यासाठी व स्लॅबचे सेंटरींग लावतांना पादचाऱ्यांचा व वाहनांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्‍यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे.

पोहोच रस्त्याचे उर्वरित काम व गर्डरवरील स्लॅबचे काम पूर्ण करुन येत्या पावसाळयापूर्वी डोंबिवली पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाण पूल वाहतूकीला खुला करणेबाबत नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वेकडील लोकांना डोंबिवली पश्चिमेला जाण्यासाठी सध्या जो ठाकुर्ली येथून वळसा घालून जाण्याचा एकमेव मार्ग आहे त्याला कोपर उड्डाण पूलाचा दुसरा पर्याय खुला होईल असे आयुक्तांतर्फे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *