Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

येणारी प्रत्येक निवडणूक जिंकायचीच या जिद्दीने काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे!- अमीत देशमुख

संपादक: मोईन सय्यद/लातूर प्रतिनिधी

लातूर: लातूर येथील काँग्रेस भवनात अहमदपूर येथील विविध राजकीय पक्षातील नेते तथा बसपाचे माजी जिला अध्यक्ष श्रीकांतजी बनसोडे, नगर परिषद अहमदपूरचे माजी गटनेते रहीमखान पठाण, सय्यद तौसीफ सर, शेख उमर सर आदी कार्यकर्त्यांनी माजी मंत्री, आमदार अमीत देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या प्रसंगी लातूर जिल्ह्यातील काँग्रेसचे युवा नेते, आमदार धीरज विलासराव देशमुख, मा.आ.त्रिंबक नाना भिसे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, काँग्रेस पक्षाचे राज्य सचिव अभय साळुंके, काँग्रेसचे नेते डॉ. गणेश कदम, तालुका अध्यक्ष हेमंत पाटील, चंद्रकांत मद्दे, शहराध्यक्ष विकास महाजन, चाकुर तालुका अध्यक्ष विलास पाटील, सिराजोद्दीन जागीरदार, मा.उपनगराध्यक्ष कलीमोद्दीन अहमद, केदार काडवादे, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा काँग्रेसच्या वतीने आगामी जिल्हा परिषद, नगर परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवन लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत अमित देशमुख यांनी नवीन प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून सम्मानीत केले व आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कोरोना प्रादुर्भाव काळात काँग्रेस पक्षच रस्त्यावर उतरून जनतेची मदत करीत होता, अशा अनेक तळागाळातील लोकोपयोगी कार्य करणारा पक्ष म्हणून जनता काँग्रेसकडे पाहात आहेत म्हणून समाजकारणासाठी राजकारण करणाऱ्या काँग्रेस पक्षाला जनता कधीही विसरणार नाही हे यावेळी आवर्जून सांगितले.

येणारी प्रत्येक निवडणूक जिंकायचीच! या जिद्दीने काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, प्रत्येक बूथ, वॉर्ड, गाव, मतदार संघ, काँग्रेस पक्षासाठी मताधिक्य देईल या पद्धतीने पक्षाची बांधणी करावी, आपल्यावर असलेल्या जबाबदारीच्या मर्यादेत काटेकोर नियोजन करून कामाला लागावे असे आवाहन करून त्यासाठी आवश्यक असणारे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले.

सामाजिक सौहार्द तसेच कायदा आणि सुव्यवस्था कायम राखून जिल्ह्याचा समतोल विकास काँग्रेस पक्षच करू शकतो हे जनतेला पटवून द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने स्वतःला उमेदवार असे समजून कामाला लागावे येणाऱ्या काळात सत्ता आपलीच असेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *