आपलं शहर

शहरातील तळागाळातील नागरीकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी आंदोलन उभं करण्याची जबाबदारी युवक कॉंग्रेसची – मुझफ्फर हुसैन

मीरा भाईंदर, प्रतिनिधी : काँग्रेस पक्षाच्या १३६ व्या स्थापना दिवसा निमित्त मीरा भाईंदर युवक काँग्रेसकडून युवा संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाईंदर पश्चिमेकडील सेकंडरी शाळेच्या आवारात आयोजित या कार्यक्रमात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांची विविध पदावर नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमाला महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे आयोजक मिरा भाईंदर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीप काकडे यांनी उपस्थित युवकांना संबोधित केले. शहरात अनेक समस्या आहेत. आपल्याला जनतेच्या घराघरात पोहचण गरजेचं आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेत पुढच्या निवडणुकीत १२ पेक्षा अधिक युवक काँग्रेसचे नगरसेवक असतील, असा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला.

इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेसची स्थापना झाली त्याला 136 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानंतर देशाच्या जनता काँग्रेस सोबत राहिली. सध्या देशाची परिस्थिती लक्षात घेता भाजप वाटोळं करायला निघाली आहे. भारताचे संविधान धोक्यात असून जनतेनं जागृत होणं गरजेचं आहे. देशात भाजप फक्त जातीपातीचे राजकारण करत आहे. देशाच्या मोठ्या संस्थांचा गैरवापर होत असल्याचं मत माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांनी व्यक्त केलं.

या कार्यक्रमात ५० हुन अधिक नव्या कार्यकर्त्यांना पदभार देऊन मिरा भाईंदर युवक कॉंग्रेस मध्ये नियुक्ती करण्यात आली. त्याच प्रमाणे १६७ तरुणांनी युवक कॉंग्रेस मध्ये पक्षप्रवेश घेतला.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *