Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मिरा भाईंदर महापालिके तर्फे “राष्ट्रीय एकता दिवस” साजरा!

“राष्ट्रीय एकता” दिनानिमित्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले “मानवी एकता साखळीचे” आयोजन

31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्टाचाराविरुद्ध दक्षता जनजागृती सप्ताह करण्यात येणार साजरा – आयुक्त दिलीप ढोले

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: संपूर्ण देशात 31 ऑक्टोबर रोजी थोर स्वातंत्र्य सैनिक व भारताचे पहिले गृहमंत्री स्वर्गीय सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी केली जाते. या निमित्ताने मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालय प्रांगणात “राष्ट्रीय एकता दिनाचे” औचित्य साधून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या अध्यक्षतेखाली “मानवी एकता साखळी” चे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मनोरकर, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (उद्यान) संजय शिंदे, उपायुक्त (सार्व. आरोग्य) रवी पवार, शहर अभियंता दिपक खांबित, अतिरिक्त शहर अभियंता सुरेश वाकोडे, तहसीलदार नंदकिशोर देशमुख, महानगरपालिका विभागप्रमुख/खातेप्रमुख व कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.

सदर प्रसंगी “राष्ट्रीय एकता दिनाचे” औचित्य साधून राष्ट्रीय एकात्मकतेची शपथ घेण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्टाचाराविरुद्ध दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार असून त्याची अंमलबजावणी मिरा-भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात देखील करण्यात येणार असल्याचे आयुक्त यांनी सांगितले.

भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी सर्व विभागप्रमुख/खातेप्रमुख व कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रतिज्ञा घेण्यात आली. सदर शपथ/प्रतिज्ञा समाप्तीनंतर मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालय पासून अंदाजे एक ते दीड किलोमीटर इतकी लांब “मानवी एकता साखळी” तयार करून शहरातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मकते बाबत जनजागृती करण्यात आली. या मानवी एकता साखळीमध्ये आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, महानगरपालिका सर्व विभागप्रमुख/खातेप्रमुख, कर्मचारी व सफाई कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

31 ऑक्टोबर ते 06 नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्टाचार विरुद्ध दक्षता व जनजागृती मोहीम चालविण्यात येणार असून या काळात भ्रष्टाचार मुक्त प्रशासन चालविण्याचे आवाहन आयुक्त दिलीप ढोले यांनी जरी केले असले तरी मात्र महापालिका प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यावर खरे उतरतात का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *