Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

मनसे आमदार राजू पाटील यांच्या निधीतून विकासकामांचा शुभारंभ..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीतील मानपाडा रोडसाठी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यामार्फत २७ कोटीचा निधी मंजूर झाला होता. मात्र मधल्या काळात ही कामे मागे पडली होती. पण विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या कामातील अडथळे दूर केले असून लवकरच मानपाडा रस्त्याचे काम सुरू होईल. रस्त्यांच्या कामाला सुरूवात होईपर्यंत रस्त्यावर पॅच लावण्याची विनंती केली असल्याची माहिती मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित पत्रकारांसमोर दिली आहे.

आमदार राजू पाटील यांच्या आमदार निधीतून मतदार संघातील विविध कामांचे भूमीपूजन व उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी आमदार राजू पाटील बोलत होते. आमदारच्या निधीतून देसलेपाडा येथील रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या अंतर्गत ‘सद्गुरू आर्केड’ ते ‘श्री गणेशनगर’ पर्यंतच्या रस्ता काँक्रीटीकरणासाठी रुपये २५ लाख, ‘अमा पॅलेस’ ते ‘शिवस्पर्श सोसायटी’ करिता रुपये २५ लाख तर ‘शिवस्पर्श सोसायटी’ ते ‘सलोनी प्लाझा’ बिल्डींग पर्यंत काँक्रीटीकरणासाठी रुपये २५ लाखाचा निधी देण्यात आला आहे.

शुभारंभ प्रसंगी, घारिवली गावचे सरपंच योगेश पाटील, हेदुटने गावचे सरपंच तकदीर काळण, काटई गाव उपसरपंच काशिनाथ पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर जाधव, काटई ज्येष्ठ नागरिक दगडु पाटील, घेसरचे साईनाथ भोईर, माजी नगरसेविका रविना माळी, भाजपाचे अमर माळी, बळीराम पाटील, महेश माळी, प्रल्हाद माळी, संजय देसले, दिलीप देसले, निर्मल भोईर, सुदेश चुडनाईक, ओम लोके, आदी पदाधिकारी तथा मनसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आमदार पाटील म्हणाले, कल्याण ग्रामीण परिसरातील लोकसंख्या जास्त आहे त्याप्रमाणो या परिसरातील समस्या देखील जास्त आहेत. कडोंमपा मालमत्ता कर घेतात पण सुविधा देत नाही. कडोंमपा रस्त्यातील खड्डे भरण्यास सांगत आहे पण त्याकडे ही महापालिका दुर्लक्ष करीत असते. नागरिकांना पाण्यासह, रस्ते अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. तरी ही ते लोकप्रतिनिधीचे स्वागत करीत आहात ही गोष्ट अभिमानास्पद आहे. तसेच निवडणूकीत मतदारांनी डोळे उघडे ठेवून मतदान करावे. पक्ष न पाहता उमदेवाराला पाहून मत द्या. जो लोकप्रतिनिधी तुमच्यासाठी काम करेल अशाच व्यक्तींना मत द्या असा सल्ला ही आमदार राजू पाटील यांनी दिला.


एकता नगर येथील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांच्या वतीने संजय देसले यांनी निवेदन देऊन  केली.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *