मराठवाडा

सर्वसामान्य उपेक्षित जनतेला सत्तेत आणण्यासाठी परिवर्तन आघाडीला संपूर्ण महाराष्ट्रात घेऊन जाऊ! – आमदार इम्तियाज जलील

लातूर, प्रतिनिधी : लातुर जिल्ह्यातील उदगीर येथे जिल्हा परिषद व पंचायत सिमितिचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी एमआयएमचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांची सभा संपन्न झाली या सभेत बोलताना आमदार इम्तियाज जलील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बोलले की, दलित-मुस्लिम-ओबीसीच्या परिवर्तन आघाडीला भविष्यात चांगले दिवस येणार असून महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्ष व नेता यांना सत्तेतुन दूर करण्यासाठी व सर्वसामान्य उपेक्षित जनतेचे सरकार स्थापनेसाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे तसेच सत्ते पासून नेहमीच वंचित असलेल्या दलित-मुस्लिम-ओबीसी समाजाला सत्तेत आणण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडी, एमआयएम, शेतकरी संघटना, अवामी विकास पार्टी, आरपिआय, ऐक्यवादी यांच्या परिवर्तन आघाडीला आता महाराष्ट्रात चांगली संधी आहे आणि म्हणून आपण महाराष्ट्रात सर्वांना सोबत घेऊन जाऊ असे उद्गार एमआयएमचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यानी काढले आहेत.

हाळी हंडरगुळी येथे जिल्हा परिषद उमेदवार मनीषा अजय मुंडकर यांच्या जाहिर सभेत आमदार इम्तियाज जलील बोलत होते. जिल्ह्यातील परिवर्तन आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतानी विजय करा! असे आव्हान आमदार इम्तियाज जलील यांनी यावेळी केले. या जाहीर सभेत मंचावर महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड. अण्णाराव पाटिल बसवंत आप्पा उबाले एमआयएमचे लातूर जिल्हा अध्यक्ष सय्यद ताहेर हुसेन, सनाउल्ला खान, अफजल कुरैशी, मुजीब हमदुले, सय्यद अनवर, उदगीर विकास आघाडीचे एड. प्रभाकर काळे, महाराष्ट्र विकास आघाडी लातूर शहर अध्यक्ष इस्माईल फुलारी, युवा जिल्हाअध्यक्ष नाजमा शेख, एमआयएमचे अहमदपुर शहरअध्यक्ष जिलानी मनियार, खुरेश एजाज, कुरेशी ज़हीर, हाळी हंडर गुळीचे इरफ़ान डांगे, शादुल्ला शेख व इतर अनेक हजारों कार्यकर्ते उपस्थित होते.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *