गुन्हे जगत महाराष्ट्र

सोन्याचे दागिने गहाण ठेवून फसवणूक करणारी टोळी अटक.

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भिवंडी येथील शांती नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोन्याचे दागिने गहाण ठेवून फसवणूक करणाऱ्या टोळीला शांतीनगर पोलीस ठाणे, भिवंडी यांनी अटक केली आहे.

याबाबत मिळालेले वृत्त असे आहे कि, एका महिलेने फिर्यादी यांचे अंदाजे साडे सहा तोळे वजनाचे एकूण ९०,०००/- रुपयांचे सोन्याचे दागिने ६ महिन्यात परत देतो असे सांगून ते ठरलेल्या वेळेत परत न देता स्वतःकडे ठेऊन फिर्यादी यांच्या दागिन्यांचा अपहार केला असल्याबाबत तसेच फिर्यादी यांच्यासह इतर महिलांचे देखील दागीने आणि रोख रक्कम १ तोळे सोन्याच्या बदल्यात १५०० रु. व १,००,०००/- रुपयांवर १०,०००/- प्रती महिना व्याज अशा वेगवेगळ्या स्कीम सांगून ठेऊन घेऊन त्यांची फसवणूक केली म्हणून शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर गुन्ह्यातील महिला आरोपीसह तिच्या सात साथीदारांना अटक केली. अटक आरोपींनी भिवंडी शहरातील एकूण २६५ लोकांची वरील प्रमाणे फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

सदर प्रकरणी पोलिसांनी एकूण २४०६. ७ ग्रॅम वजनाचे ७३,५४,३२०/- रु. किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत व पुढील तपास सुरू आहे असे शांतीनगर पोलीस यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *