Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

२९ जून २०२२ च्या मंत्रिमंडळ बैठकीतील ठाकरे सरकार ने लोकहितासाठी घेतलेले महत्त्वाचे निर्णय..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात सरकार अस्थिर असताना राज्यपाल यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द करण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २९ जून २०२२ रोजी झालेल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बठकीत लोकहितासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले.

औरंगाबाद शहराच्या “संभाजीनगर” नामकरणास मान्यता.

उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव” नामकरणास मान्यता.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता.

राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार.

कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार.

अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार.

ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार.

विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय.

निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय शासन अधिसुचना ८ मार्च २०१९ अनुसार आकारावयाच्या अधिमुल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आले.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *