Latest News महाराष्ट्र

मोदींनी ३७० कलम हटवताना जी हिंमत दाखवली ती मराठा आरक्षणासाठीही दाखवावी : उद्धव ठाकरे

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिक्षण आणि नोकऱ्यांमधील मराठा समाजाचे आरक्षण घटनाबाह्य असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दि.०५ रोजी दिला. मराठा आरक्षण विषय राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा आलेला निकाल तमाम मराठा बांधवांसाठी धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला.

मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायलयाने नेमकं काय म्हंटलं?

राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले. मराठा आरक्षणाच्या लढाईत निराशाजनक निर्णय आला आहे. त्यानंतरही मराठा समाजाने संमजस्यपणा दाखवल्याबद्दल त्यांचे आभार मानत असल्याचे ते म्हणाले. छत्रपती संभाजीराजे यांनीही संयम दाखवला. ते म्हणाले की, ज्या वकीलांनी उच्च न्यायालयात विजय मिऴवून दिला त्यांनीच सर्वोच्च न्यायालयात केस लढली. निकालावर अभ्यास केला जात आहे.

केंद्राला ‘सर्वोच्च’ दिलासा! दिल्लीत ‘मुंबई मॉडेल’ राबवण्याचा दिला सल्ला

मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा आरक्षणाची लढाई संपलेली नाही. न्यायालयाने मार्ग दाखवून दिला आहे. न्यायालयाने आरक्षण कायदे करण्याचे अधिकार राज्याला नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी हा अधिकार पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कलम ३७० हटवताना जी हिंमत दाखवली तशीच हिंमत मराठा आरक्षणासाठीही दाखवावी आणि मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्यावा. यासाठी उद्या पीएम मोदींना पत्र लिहिणार आहे.

*मराठा आरक्षण : ९ सप्टेंबर २०२० पर्यंतचे प्रवेश वैध*
आपल्याला हक्क आपल्याला मिळवून देऊ असे मुख्यमंत्री म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हाती आल्यानंतर आम्ही अभ्यास करत आहोत. यासाठी ज्येष्ठ विधीज्ञांची समिती नव्हे फौज नेमली असल्याचे ते म्हणाले.

दुसरीकडे मराठा समाजाच्या मागास स्थितीबद्दल अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गायकवाड समितीचा अहवाल स्वीकाराहार्य नसल्याचे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. दरम्यान आरक्षण धोरणानुसार ९ सप्टेंबर २०२० पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते, ते वैध असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री कोरोना परिस्थितीवर बोलताना म्हणाले की कोरोना नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेचे केलेल्या प्रयत्नांचे न्यायालयाने कौतुक केले आहे. महाराष्ट्रातील रुग्णवाढ मंदावली आहे. देशातील प्रमुख शास्त्रज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे गाफील राहुन चालणार नाही. केंद्राकडे २०० कोटी मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी केली आहे. लसपुरवठा वाढला की लसीकरणाला वेग येईल.३ हजार टन मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचा मानस असून दररोज १७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी सुरु केली गेली असून काही दिवसात ऑक्सिजनमध्ये महाराष्ट्र स्वयंपूर्ण होणार.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *