Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

५० खोके, एकदम ओके, खेळत बसा तुम्ही एक्के, आम्ही आहोत पक्के : रामदास आठवले


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

५० खोके, एकदम ओके, खेळत बसा तुम्ही एक्के, आम्ही आहोत पक्के, अशा कवितेच्या चारओळी ऐकवत आठवले यांनी उपस्थितांना खळखळून हसवलं. बालगंधर्व रंगमंदिरात रिपाइंच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. विरोधक रोजच आमचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र काहीही झालं तरी आमचं सरकार पडणार नाही. सुरुवातीपासूनच शिवसेना-भाजप आणि आरपीआय बरोबर एकत्र होती.

शिवसेनेनं आमची साथ सोडून महाविकास आघाडीचा रस्ता स्वीकारला आणि आमच्यापासून फारकत घेऊन दूर गेली. आता एकनाथ शिंदे गट आणि भाजप एकत्र आल्यामुळे विरोधक आमचं सरकार पाडण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत, असं रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.

यंदाच्या डिसेंबरपर्यंत महापालिकेच्या निवडणूका होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. प्रभाग रचना आणि काही अन्य कारणामुळे निवडणूका रखडल्या असल्या तरी राज्यातील प्रत्येक शहरात या निवडणुकीची तयारी जोरदार सुरु आहे. पुण्यात देखील सर्व पक्षाने निवडणूकीसाठीची तयारी सुरु केली आहे. विविध आंदोलनं, विकास कामं करण्यासाठी सरसावले आहेत.

मात्र ठाकरे सरकारने प्रभागरचनेचा निर्णय बदलल्यामुळे निवडणुकीचा गोंधळ झाला. आता निवडणुक आयोगानेही सध्या निवडणूका घेणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार सगळ्या गोष्टी नीट करत आहेत. विरोधकांनी उगाच विरोध करु नये, असंही ते म्हणाले.

ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आठवलेंची भेट घेत त्यांच्या आरक्षणाबद्दल चर्चा झाली. मराठा समाजाला जसं आरक्षण दिलं तर ब्राह्मण समाजालाही आरक्षण दिलं पाहिजे ही मागणी पुर्वीच केली असल्याचं त्यांनी सांगितलं. ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल लोकांना आरक्षण मिळायला हवं. अमृत योजनेसाठी पाठपुरावा करण्यात यावा, अशा मागण्या यावेळी ब्राह्मण महासंघाने केल्या.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *