संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे माझ्या आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. तेव्हापासून आम्ही फक्त संधी शोधत होतो. तेव्हापासून उद्धव ठाकरे यांच्या फसवणुकीचा बदला घेण्यासाठी आम्ही तयार होतो, असा धक्कादायक खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे शिवसेना सोडू इच्छित असल्याचे आम्हाला समजले. त्यांनी आमच्याशी संपर्क साधला, आम्ही त्यांना पाठिंबा दिला. आमच्यासोबत झालेली बेईमानी, उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे माझ्या आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. तेव्हापासून आम्ही संधी शोधतच होतो. आम्ही संत नाही, नेते आहोत. जर ते आमच्याशी अप्रामाणिक असतीलल तर आम्ही त्याला उत्तर देऊच. माझ्यासोबत झालेल्या बेईमानीचा बदला मी घेतला, असा खुलासा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला.
आम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितले की तुम्ही बाहेर पडणे चांगले आहे, आम्हालाही आमचा बदला हवा आहे. त्यानंतर अनेक घडामोडींनंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. सरकार स्थापनेचे संपूर्ण श्रेय उद्धव आणि आदित्यजींना द्यावे लागेल, असे म्हणत शिंदे यांच्याशी केलेल्या वागणुकीमुळे त्यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला, असा टोमणाही त्यांनी मारला.
महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली. त्यानंतर भाजपने सरकार स्थापन करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यावर सवाल केला की, “मुख्यमंत्रीपदावर आल्यानंतर तुम्ही सरकारमध्ये दुसरे कोणतेही पद घेतल्यास तुम्ही सत्तेचे भुकेले आहात, अशी तुमची प्रतिमा बनते. पण आपण खुर्चीसाठी नाही तर परिवर्तनासाठी सत्ता बदलली आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांत महाराष्ट्रात घडलेल्या घटना पाहता हा बदल करण्यात आला आहे. म्हणूनच मी सत्ता सोडण्याचा निर्णय घेतला होता, पण माझ्या पक्षाच्या नेत्यांनी मला समजावून सांगितले की त्यांना महाराष्ट्रात सरकार चालवायचे आहे आणि त्यासाठी माझी गरज आहे, म्हणून मी हो म्हणालो.” अशी कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिली.