Latest News महाराष्ट्र

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अखेर राजीनामा!

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी:अवधुत सावंत

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर मंथन सुरू आहे. देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले आहे. माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लादलेल्या १०० कोटींच्या शुल्काबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविली आहे. इतकेच नव्हे तर कोर्टाने सीबीआयला १५ दिवसांच्या आत या संदर्भात प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत आणि त्यांच्या चौकशीत काही तथ्य समोर आल्यास पुढील कारवाई करा असे सांगितले आहे. वकील जयश्री पाटील यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात ही याचिका दाखल केली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव देखील घेतले जात आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्या नंतर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून महाविकास आघाडी सरकारवर हल्ला करण्याची आणखीन एक संधी विरोधकांना मिळाली आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *