Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

उच्च न्यायालयाने याचिका कर्त्यालाही फटकारत ठाकरे, राऊत, देशमुखांवरील सर्व याचिका फेटाळल्या..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला मोठा दिलासा दिला आहे. निव्वळ प्रसिध्दीसाठी राजकीय हेतूने प्रेरीत उद्धव ठाकरे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. इतकेच नव्हे तर, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावरील प्रसिद्धीसाठी दाखल केलेल्या याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.

न्यायमूर्ती एस.व्ही.गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस.जी.डिगे यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी हेमंत पाटील यांनी अशाचप्रकारे दाखल केलेल्या तीन याचिकांही न्यायालयाने फेटाळून लावला आहेत.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील शंभर कोटी वसुलीच्या आरोपांत उद्धव ठाकरे यांचीही तपासयंत्रणेनं चौकशी करावी, अशी मागणी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी याचिकेतून केली होती. या याचिकेतही खंडणी उकळल्याचे आरोप करण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेत खंडणी उकळल्याचे आरोप केले होते. याशिवाय निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेचाही उल्लेख होता.

तसेच, हेमंत पाटील यांनी संजय राऊत यांच्या विरोधात कोविड कालावधीत औषधोपचारांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणारी याचिका दाखल केली होती. संजय राऊत यांच्यासह त्यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत, सुजीत पारकर यांच्यावरही या याचिकेत आरोप केले होते. पण ही याचिकाही निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा ठपका ठवला. तसेच, याचिकाकर्त्याने यात कोणतेही ठोस पुरावे, माहिती आणि कागदपत्रे दिलेली नसल्याचे निरीक्षणही नोंदवले.

याशिवाय हेमंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नबाव मलिक यांच्याविरोधातही तिसरी याचिका दाखल केली होती. माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांमुळे सामाजिक सलोखा बिघडतो असा दावा याचिकेत पाटील यांनी केला होता. पण उद्धव ठाकरे यांच्यासह केलेल्या या सर्व याचिका निव्वळ प्रसिद्धीसाठी दाखल केल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने या याचिका फेटाळून लावल्या आहेत.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *