Latest News आपलं शहर कोकण महाराष्ट्र

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यानीं साकेत येथील पम्पिंग स्टेशनला केली “सप्राईज व्हिजिट” पाणी पुरवठ्यासंबंधित जाणून घेतली माहिती!

संपादक: मोईन सय्यद/ मिरा-भाईंदर प्रतिनिधी

मिरा भाईंदर शहरातील पाण्याच्या समस्येचे निवारण करण्याच्या हेतूने, पाठपुरावा करत मिरा भाईंदर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने आज मि. भा. म. न. पा. च्या ठाणे येथील साकेत पम्पिंग स्टेशन येथे “सप्राईज व्हिजिट” केली. एकंदरीत या पम्पिंग स्टेशनवर नेमक्या काय अडचणी आहेत? MIDC कडून येणाऱ्या पाण्यामध्ये पुरवठा नीट होण्यातील तांत्रिक बाबी सविस्तर पणे चर्चा करून समजून घेतल्या. दररोज येणाऱ्या पाण्याच्या व्हॉल्युम वरील फ्लकच्युएशन, प्रेशर मधील फरक, पाण्याचे फिल्टरेशन, शटडाऊनची कारणे, पाण्याच्या पाईपलाईन मधील गळती आणि अन्य महत्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा केली.

मिरा भाईंदर शहरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या निर्देशानुसार जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने साकेत येथे कुठलीही पूर्व सूचना न देता कार्यरत पाहणी केली. याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष लीलाताई पाटील, नगरसेविका रुबिना फिरोज, मर्लिन डीसा, गीता परदेशी, माजी नगरसेवक फरीद कुरेशी, मिरा भाईंदर युवक काँग्रेस अध्यक्ष दीप काकडे व ओवळा माजीवडा युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल काटकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

MIDC कडून मिरा भाईंदर शहराला होणारा पाणी पुरवठा शहरात व्यवस्थित येत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी सत्ताधारी भाजप पक्षाची आहे, महापौर, उपमहापौर यांची आहे. केवळ महानगरपालिका भवनात बसून सगळी काम होत नसतात. सत्ताधाऱ्यांना लोकहितासाठी चेंबर मधून बाहेर पडून खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरून काम करणं गरजेचं आहे. मात्र मिरा भाईंदर शहराच्या दुर्दैवाने सत्ताधारी सध्या केवळ आपआपसांत हेवेदावे सांभाळण्यात मग्न आहेत. शहरातील सर्व नागरिकांना सुयोग्य पाणी मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे, असे मत यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी व्यक्त केले असून शहराला होणारा पाणी पुरवठा सुरळीत चालू राहावा यासाठी आम्ही यापुढेही असेच वेळोवेळी या साकेत येथील पंपिंग स्टेशनला भेट देत राहू असे म्हंटले आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *