Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

गटातटातील विखुरलेल्या बौद्ध समाजाने एकत्र यावे – भन्ते राहुल बोधी


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

बौद्ध समाज डोंबिवली तर्फे आज डोंबिवली पूर्व येथे गांधीनगरातील धर्मवीर आनंद दिघे सभागृहात आज ‘कठीण चिवरदान सोहळा, वर्षावास सांगता समारंभ व भव्य धम्म रॅली २०२२’ चे आयोजन करण्यात आले होते. डोंबिवली शहरात गेल्या तीन महिन्यांपासून वेगवेगळ्या विभागात संपन्न झालेल्या वर्षवासाचा सांगता समारंभ सामुदायिकपणे करण्याचे योजिले होते.

समाजामध्ये डॉ.बाबासाहेबांची जयंती छोट्या मंडळ, विभाग आणि गटांमध्ये साजरी होते. त्यामुळे डॉ.आंबेडकरांनी दिलेली बौद्ध धम्माची संस्कृती आपल्या समाजात रुजली गेली पाहिजे. आज जो समाज गटातटात विखुरला गेलेला आहे तो अपेक्षित नाही. समाजाला एकत्र करायचे असेल तर बौद्ध धम्म शिवाय दुसरे कुठलेही माध्यम नाही असे प्रतिपादन भन्ते राहुल बोधी यांनी डोंबिवली येथील वर्षावास सांगता सोहळा कार्यक्रमाच्या वेळी केले.

वर्षावास सांगता समारंभाचे बौद्ध समाजाच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या सोहळ्यानिमित्त कठीण चिवर दान सोहळा व धम्म रॅली २०२२ चा सोहळा पार पडला. सुमारे पन्नासहून अधिक भन्ते सहभागी झाले होते. याच कार्यक्रमात पुढे बोलताना भन्ते राहुल बोधी यांनी सांगितले की, वर्षावास हा बौद्ध धर्मात सुमारे २५०० वर्षापासून चालत आलेले प्रतिक आहे. जे भारतात नव्हे तर जगात सुद्धा प्रसिद्ध आहे. वर्षावास ही संस्कृती आपल्या समाजात रुजली पाहिजे, आत्ताच्या तरुण पिढीवर बुद्ध धम्म्माच्या विचाराचा प्रभाव पडल्यास भावी पिढी सुसंस्कृत होईल. बौद्ध समाजाचा आर्थिक, सामाजिक विकास होऊन बौद्ध समाज आदर्श पिढी म्हणून जगासमोर यावा या विचाराचे मंथन म्हणजे ‘वर्षावासाचे नियोजन’ असल्याचे महाथेरो राहुल बोधी यांनी सांगितले.

 

तर भन्ते आनंद महाथेरो यांनी आपल्या देशात बुध्दांनी दिलेला शांततेचा संदेश आणखी खोलवर रुजवला गेला तर शांती नांदण्यास मदत होईल असे प्रतिपादन त्यांनी केले. वर्षावास काळात भगवान गौतम बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे ज्ञान संपादन करायचं असते. भगवान बुद्धाच्या धम्माच्या झेंड्या खाली सर्व समाज एकवटला पाहिजे. भगवान बुद्धाच्या धम्माचा सर्व जगात प्रसार होत आहे. हा बुद्धांचा देश आहे म्हणून ह्या देशात बुद्ध हवा युद्ध नको असे सांगत सर्व बौद्ध समाजाने एक व्हावे असा संदेश येथील उपस्थित उपासकांना त्यांनी दिला.

या वर्षावास सांगता समारंभ व भव्य धम्म रॅली २०२२ चे मुख्य संयोजक भन्ते राहुल बोधी थेरो, प्रमुख मार्गदर्शक भन्ते डॉ. एन.आनंद महाथेरो, रॅलीचे स्वागत, सांगता समारंभाचे नियोजन अध्यक्ष डी. डी. जाधव आणि कार्यकारिणी, महिला मंडळ सम्यक धम्म सामाजिक संस्था, गांधीनगर, डोंबिवली यांनी आयोजन केले.

तर भोजनदान व विशेष मदत अंकुश गायकवाड, किरतकर कुटुंबीय, विश्वविकास गायकवाड, बिरजू जाधव, धम्मविवेक जाधव, वर्षावास सहभागी संस्था सम्यक धम्म सामाजिक संस्था गांधीनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र एम.आय.डी.सी., यशोधरा महिला मंडळ गणेश नगर, बौद्ध सेवा संघ डोंबिवली, सम्राट अशोक बुद्ध विहार संजय नगर, धम्मदीप बुद्ध विहार लोढा हेरीटेज, लुंबिनी बुद्ध विहार कोपर, भीमगर्जना महिला मंडळ त्रिमूर्तीनगर, देसलेपाडा – भोपर बौद्ध समाज, सिद्धार्थनगर रहिवासी, सहभागी राजकीय सामाजिक संस्थेचे प्रल्हाद जाधव (अध्यक्ष रिपब्लिकन पक्ष कल्याण जिल्हा), अंकुश गायकवाड (अध्यक्ष डोंबिवली शहर रिपब्लिकन पक्ष), माणिक उघडे (अध्यक्ष झोपडपट्टी महासंघ), लक्ष्मण अंभोरे (अध्यक्ष स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष), आनंद नवसागरे (रिपब्लिकन सेना), सुरेंद्र ठोके (अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी डोंबिवली – पूर्व), डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक संवर्धन संस्था, भारतीय बौद्ध महासभा, भारती फौंडेशन यांच्या उपस्थितीत विशेष सहकार्य अंबादास खंडागळे, रविकिरण मस्के, अशोक कापडणे, प्रा.धनंजय पगारे, महेंद्र जाधव, सुहास रोकडे, कल्पना चौधरी, रवींद्र गुरचळ, निलेश कांबळे, विजय इंगोले, बाजीराव माने, रवी इंगोले, अर्जुन केदार, संजय गौतम, गुलाब खंदारे, सचिन साळवी, सूर्यकांत पारधे, आशिष कांबळे, विलास खंडिझोड, श्रीकांत माने, राष्ट्रपाल ढोबळे, मनीष सरकटे यांच्या उपस्थितीत पार पडला.

 

 

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *