गुन्हे जगत

डोंबिवलीतील काटई नाक्यावर बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी पकडून दिले दीड टन गोमांस

अवधुत सावंत, डोंबिवली, प्रतिनिधी : रविवार २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० चा सुमारास बजरंग दल कार्यकर्ते श्री उत्तेकर हे काटई येथून डोंबिवलीच्या दिशेने येत होते त्या वेळेस एक बोलेरो पिकअप ट्रक त्यांना दिसला त्यातून लाल रंगाचे पाणी पडताना त्यांना दिसले म्हणून संशय आल्याने त्यांनी ती गाडी मानपाडा पेट्रोल पंप जवळ थांबवली आणि ड्रायव्हरला विचारलं की गाडीत काय आहे? तर ड्रायव्हर ने त्यांना पहिले उलटसुलट खोटी उत्तरं दिली व नंतर कबुली दिली की गाडी मध्ये जवळपास १०-१२ गाई बैलांचे मटन आहे व तो ते घेऊन मालेगाव वरून गोवंडी, मुंबईला नेत आहे. हे समजल्या वर उत्तेकर ह्यांनी बजरंग दलाचे कार्यकर्ते मनोज गिरी ह्यांना संपर्क साधला.

मग घटना स्थळी बजरंग दल जिल्हा संयोजक करण उल्लेंगल, अजीत विश्वकर्मा, निखील म्हात्रे,
मनीष चव्हाण, गणेश मिश्रा, मिथिलेश पासवान, प्रकल्प चव्हाण, अश्विन पवार, शेरा ताक, संतोष गुप्ता व इतर कार्यकर्ते पोहोचले व पोलिसांना संपर्क करून सदर गाडी घेऊन मानपाडा पोलिस स्टेशनला गेले व पशुसंवर्धन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला.

सदर प्रकरणात टेम्पो चालक आरोपी अटक केलेला आहे. व सदर गाडी चा मालक हा सराईत गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून सध्या तो दुसऱ्या एका गोमांस तस्करी प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात अटक आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *