Latest News आपलं शहर गुन्हे जगत महाराष्ट्र

मनसुख हिरेनला 45 लाखांची सुपारी देऊन ठार मारण्यात आले? फन्डिंग कुणी केली? केंद्रीय तपास यंत्रणांची दिल्लीत जाऊनही केली चौकशी

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधूत सावंत

मुकेश अंबानी यांचे घर अँटिलियाजवळ आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेनच्या हत्येप्रकरणी एक नवीन खुलासा समोर आला आहे. मंगळवारी न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सांगितले की, मनसुखला ठार मारण्यासाठी 45 लाख रुपये देण्यात आले होते. एनआयएने या प्रकरणी आरोपपत्र सादर करण्यासाठी न्यायालयाकडे आणखी 30 दिवसांची वेळ मागितली आहे.

9 जून रोजी विशेष न्यायालयाने एनआयएला मनसुख प्रकरणी आरोपपत्र सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली होती. एनआयएचे म्हणणे आहे की, या प्रकरणात पैसे कोणी दिले हे शोधण्याची गरज आहे. तपास यंत्रणेने असेही सांगितले की, आतापर्यंत 150 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. एका टीमने तपासासाठी दिल्लीला जाऊन काही लोकांची चौकशीही केली आहे.

मनसुख हिरेनच्या हत्येमुळे कुणाला फायदा होऊ शकतो? किंवा त्याचे कुणाशी काही वाद-विवाद होते का? या सर्व बाबी तपास यंत्रणा तपासून पाहात आहेत.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *