Latest News देश-विदेश महाराष्ट्र

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी) साठी मूल्यमापन कार्यपध्दतीचा शासन निर्णय जाहीर

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोना पार्श्वभूमीवर राज्यात इयत्ता १०वी च्या बोर्डाची परीक्षा घ्यावी की घेऊ नये यासाठी कोर्टात गेलेल्या भांडणाचा वाद मिटावा यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता १० वीची परीक्षा रद्द केल्यामुळे, इयत्ता १० वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कशाप्रकारे करण्यात यावे, याबाबत शिक्षण विभागाच्या अखत्यारितील विविध संस्थाच्या प्रमुखांसोबत व शिक्षण क्षेत्रातील काही अनुभवी व्यक्तींसोबत चर्चा करण्यात आली होती. यामध्ये इयत्ता १० वीच्या परीक्षेसंदर्भात व विद्यार्थ्यांच्या मुल्यमापन याबाबत विविध पर्यायांचा विचार करण्यात आला. याबाबत सर्वंकष विचार करण्यात येऊन आयुक्त (शिक्षण विभाग) महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखालील समन्वय समितीच्या बैठकीत विविध पर्यायांमुळे होणारे परिणाम व करावयाची कार्यवाही याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. उपलब्ध सर्व पर्यायांचा विचार करण्यात आला व सद्यस्थितीत मूल्यमापन योजनेचा सर्वात योग्य पर्याय निश्चित करण्यात आला व त्यानुसार प्रस्ताव शासनास सादर करण्याचा निश्चय समन्वय समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संदर्भ क्र.4 येथील दिनांक १८ मे २०२१ च्या पत्रान्वये शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी माध्यमिक शालाांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी) साठी मूल्यमापन कार्यपध्दतीचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. त्यानुसार आज मंत्रिमंडळाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी) साठी मूल्यमापन कार्यपध्दतीचा शासन निर्णय जाहीर केला आहे.

मूल्यमापनाचा तपशील असा असेल

1) विद्यार्थ्याच्या इ.९ वीचा विषय निहाय अंतिम निकाल ५० गुण..

2)विद्यार्थ्याच्या इ.१० वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण..

3) विद्यार्थ्याचे इ.१० वी चे अंतिम तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षा अंतर्गत मूल्यमापन २० गुण असे मिळुन एकूण १०० गुण असणार आहेत.

विद्यार्थ्याचे प्रथम सत्र परीक्षा, सराव (पूर्व) परीक्षा यामधील एकच परीक्षा दिली असल्यास त्या परीक्षेतील विषय निहाय ८० गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुणांचे ३० पैकी गुणांत रुपांतर करण्यात येणार असल्याचे जाहीर केलेल्या शासन निर्णयात म्हंटले आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *