Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

शाळांच्या फी मध्ये १५ टक्के कपात, पालकांना दिलासा; निर्णय खाजगी शाळांना देखील लागू.. !

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य मंत्रिमंडळाने देखील शालेय शुल्क १५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने या संदर्भात निर्णय जाहीर केला आहे. महत्वाचे म्हणजे हा निर्णय खाजगी शाळांना देखील लागू असणार असल्याचा अद्यादेश राज्य सरकार लवकरच काढणार आहे.

राजस्थानमध्ये सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या प्रकरणामध्ये जो निकष ठेवण्यात आला आहे. त्याच निकषानुसार राज्यातही शालेय शुल्क कपात करण्यता आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना फार मोठा दिलासा मिळेल याबाबत अध्यादेश राज्य सरकारद्वारे दोन दिवसांत जारी करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे आता खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांनासुद्धा ८५ टक्के फी भरावी लागणार आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे खासगी शाळांच्या फी वाढीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील खासगी शाळा १५ टक्के फी कपात करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना प्रश्न केला असता त्यांनी राज्य सरकारचा हा निर्णय यंदा लागू असणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे खासगी शाळांच्या फी मध्ये १५ टक्के कपातीचा अध्यादेश काढण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खासगी शाळांच्या फी मध्ये १५ टक्के कपात करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. दोन दिवसांत अध्यादेश काढण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या आदेशामुळे खासगी शाळांची फी १५ टक्के कपात करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला सुद्धा राजस्थानप्रमाणे १५ टक्के फी कपातीचा निर्णय घ्यावा असे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *