संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
मध्य रेल्वेकडून राबवण्यात आलेल्या तिकीट तपासणी विशेष मोहिमेअंतर्गत सहा महिन्यात तब्बल २३ लाख २० फुकट्या प्रवाश्यांकडून दीडशे कोटी रूपायांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेच्या सहा झोन मध्ये ही मोहीम राबवण्यात आली, त्यापैकी सर्वाधिक फुटके प्रवासी मुंबई विभागात आढळून आले आहेत तर सर्वात कमी पुणे विभागात फुकटे प्रवासी तिकीट तपासनीसांना मिळाले आहेत. सहा विभागाच्या यादीत नागपूर विभाग तिसऱ्या स्थानी आहे.
नागपूर विभागातही ३ लाख ३४ हजार फुकटे प्रवासी आढळून आले असून त्यांच्याकडून २२ कोटी ३६ लाख रुपये वसूल करण्यात आले आहे. मुंबई विभागात ९ लाख फुकट्या प्रवाश्यांकडून ५१ कोटीचा दंड वसूल करण्यात आला आहे तर भुसावळ विभागात ४ लाख ८९ हजार अवैध प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडून ३८ कोटी ५८ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे असे मध्य रेल्वेकडून प्रसार माध्यमांना सांगण्यात आले आहे.