कॅडेव्हर प्रोग्रामव्दारे ब्रेन-डेड झालेल्या ७३ वर्षाच्या रूग्णाच्या कुटूंबियांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे एका तरूणाने मिळाले जीवनदान!
मुंबई, प्रतिनिधी: मिरारोड पूर्वेकडील वोक्हार्ट हॉस्पिटल्स, येथे 73 वर्षांच्या ब्रेन-डेड रुग्णाच्या कुटुंबाने त्याच्या अंतिम इच्छा म्हणून रुग्णाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे या रुग्णाने केलेल्या मूत्रपिंड (किडनी) दानामुळे याच रुग्णालयातील एका ४३ वर्षीय रुग्णाला नवजीवन मिळाले आहे.
वॉक्हार्ट रूग्णालयातील कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ. पुनीत भुवानिया आणि सल्लागार यूरोलॉजिस्ट, एंड्रोलॉजिस्ट आणि रेनल ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. आशुतोष बघेल यांनी एकत्रितपणे ही मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली आहे.
दिल्लीचा सौरव मुखर्जी हा ४३ वर्षीय पुरूष रुग्ण क्रोनिक किडनी विकारामुळे गेल्या ४ वर्षांपासून डायलिसिसवर होता. झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर (ZTCC) आणि वोक्हार्ट रूग्णालयाच्या कॅडेव्हर प्रोग्रामद्वारे रुग्णाला किडनी मिळाली. तो दिल्लीहून मुंबईला रवाना झाला आणि आवश्यक क्रॉस-मॅच चाचणीनंतर ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली असून मीरारोडच्या वोक्हार्ट रूग्णालयात यशस्वी मूत्रपिंड(किडनी) प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. १० दिवसांनंतर त्याला रूग्णालयातून घरी सोडण्यात आले असून आता तो सामान्यपणे जीवन आपले जगत आहे.
डॉ. पुनीत भुवानिया, वोक्हार्ट रूग्णालय, मीरारोड येथील कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन यांनी माहिती देताना सांगितले की, डोनर हे ७३ वर्षीय गृहस्थ होते. त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे ब्रेन डेड घोषित करण्यात आले होते. या दात्यामुळे सहा जणांचे जीव वाचवले जाऊ शकतात असे त्यांच्या कुटूंबियांनी सांगितले. त्यांच्या कुंटूंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेत मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसे आणि त्वचा दान करण्यात आली. त्यापैकी श्री सौरव यांना किडनी मिळाली असून वोक्हार्ट रूग्णालयात यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली आहे.
अवयव दानामुळे एक व्यक्ती ८ लोकांचे जीव वाचवू शकते. यामध्ये मूत्रपिंड, यकृत, हृदय, आतडे, डोळे, फुफ्फुसे, स्वादुपिंड आणि त्वचेचा समावेश असतो. प्रत्येक वर्षी अंदाजे ५०,००० पेक्षा जास्त लोकांना मूत्रपिंड (किडनी) निकामी झालेल्या रुग्णांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची आवश्यकता असते तर त्यापैकी फक्त ५००० पेक्षा कमी रुग्णांना प्रत्यारोपणाची संधी मिळते.
आपल्या देशात अवयव दानाबद्दल जागरुकतेच्या अभावामुळे विविध उपक्रम राबविण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपले अवयव दान करण्याचे वचन दिले पाहिजे कारण आपल्या मृत्यूनंतरही आपण ८ लोकांचे जीव वाचवू शकतो. प्रतीक्षा यादीतील अधिकाधिक लोकांना अवयव मिळावेत म्हणून प्रत्येक नागरिकांनी अवयवदानाची शपथ घेणे गरजेचे आहे.
गरजू रुग्णाला मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यासाठी दोन मार्गांनी मिळू शकते, प्रथम जेव्हा त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांनी त्यांना एक किडनी दान केली किंवा दुसरी ते राज्य शव प्रत्यारोपण कार्यक्रम यादीमध्ये स्वतःची नोंदणी करतात.
“माझी किडनी निकामी झाल्यानंतर मला किडनी प्रत्यारोपणाची नितांत गरज होती. मी जगेन की नाही अशी शंका होती. पण वोक्हार्ट रूग्णालयाने घेतलेल्या अमर्याद परिश्रमामुळे वेळीच किडनी प्रत्यारोपण होण्याचे भाग्य मला लाभले. लाखो जीव वाचवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे येऊन अवयव दान करावेत अशी माझी इच्छा आहे” असे रुग्ण श्री सौरव यांनी सांगितले असून त्यांनी वोकहार्ड रुग्णालयातील डॉक्टर आणि त्यांचे नर्सिंग स्टाफ यांचे आभार मानले आहे.