Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकरी भूमीपुत्रांचे बेमुदत धरणे आंदोलन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

भिवंडी-कल्याण-शीळफाटा राज्य महामार्ग क्रमांक – ४० या रस्त्याच्या सहापदरी रोड रुंदीकरणात बाधित शेतकरी भूमिपुत्र जागा मालकांना योग्य तो रोख स्वरूपातील मोबदला मिळावा आणि महाराष्ट्र शासनाला जागृत करण्यासाठी ‘सर्व पक्षीय युवा मोर्चा’चा बेमुदत धरणे आंदोलन लढा मंगळवारपासून सुरू झाला आहे. रस्ता बाधित शेतकरी भूमीपुत्रांच्या या आंदोलनाची दखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घ्यावी अशी मागणी यावेळी उपस्थित पत्रकारांसमोर करण्यात आली.

डोंबिवलीतील ग्रामीण विभागातील ग्रामस्थ गजानन पाटील आणि गणेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हा बेमुदत धरणे आंदोलन लढा सुरू झाला आहे. गावागावातील रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या ग्रामस्थांनी या बेमुदत धरणे आंदोलन लढ्याला उस्फुर्तपणे समर्थन देत या बेमुदत साखळी धरणे आंदोलनात सहभागी होऊन ग्रामस्थांना अद्याप रोख स्वरूपातील मोबदला न मिळाल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे.

यावेळी सरकारच्या विरोधात आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावर आणि दुर्लक्षित कारभारावर सडकून टीका आंदोलनकर्ते करत आहेत. प्रशासनाच्या दंडेलशाही विरोधात घोषणा व नारे देत या प्रकल्पातील बाधित शेतकरी भूमिपुत्रांना न्याय हा मिळालाच पाहिजे व यासाठी कितीही वेळकाळ लागला तरी मागे हटणार नाही असा पावित्रा घेत मंगळवारपासून बाधित शेतकरी भूमिपुत्र ग्रामस्थांनी कल्याण-शीळ रोडवर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

मंगळवारी सकाळपासून सुमारे ४०० बाधित भूमिपुत्र या बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी झाले असून काटई गाव, कल्याण शीळ रोडवर काटई जकात नाक्याजवळील मोकळ्या जागेत मोठा मंडप टाकून आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागणीसाठी ठिय्या मांडला आहे. या साखळी बेमुदत धरणे आंदोलनात शासनाच्या नियमानुसार रस्त्यातील बाधित शेतकरी भूमिपुत्रांना रोख स्वरूपातील मोबदला मिळाला नाही तर कुटुंबासह रस्त्यावर उतरून ‘रास्ता रोको’ करत उग्र आंदोलन करून सर्व कुटुंबासह जेल भरून गेले तरी चालेल यासाठी आम्ही जामीन घेणार नाही आणि सरकारी जेलमध्येच राहू अशी भूमिका आंदोलन कर्त्यांनी घेतल्याचा इशारा या वेळी बाधित शेतकरी भूमिपुत्र ग्रामस्थांच्या वतीने आंदोलनकर्ते गजानन पाटील आणि गणेश म्हात्रे यांच्या वतीने सरकारला देण्यात आला.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *