Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

सोनारपाड्यातील शेतकऱ्यांचा लोकनेते दि.बा. पाटील जयंतीदिनी आत्महत्येचा इशारा !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई गोग्रास भिक्षा सोसायटीने शासन प्रशासनाच्या संगनमताने संरक्षित कुळे असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीची बांधकाम व्यावसायिकाला परस्पर जमीन विक्री केल्याने, उपासमारीची वेळ आल्याने सोनार पाडा (मौजे दावडी) येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जयंतीदिनी मंत्रालय किंवा मुंबई भिक्षा सोसायटीच्या कार्यालयासमोर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

सोनार पाड्यातील शेतकरी व त्यांचे पूर्वज १९३२ पासून शेत जमिनी कसत आहेत. भात,भाजीपाला अशी तत्सम पिके घेत आहेत. असे असताना मुंबई गोग्रास भिक्षा सोसायटीने आम्हां शेतकऱ्यांची कुठलीही विक्री परवानगी च्या विश्वासात न घेता ८० (८०.७१) एकर जमिनीची परस्पर विक्री केली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. भारतीय संविधान अनुच्छेद २१ चा भंग करून ही विक्री बांधकाम व्यावसायिक अजय प्रताप अशर आणि जतीन देसरिया यांना परस्पर विक्री करण्यात आली आहे. तत्कालीन धर्मदाय आयुक्त एन.व्ही.जोशी यांना खोटी माहिती देऊन ही विक्री करण्यात आली आहे. धर्मदाय आयुक्तांच्या विक्री परवानगी मध्ये ते १ ते ७१ क्रमांकाच्या संरक्षित कुळांचा उल्लेख आलेला आहे. सदर जमिनीचे सातबारा आमच्या नावावर आहेत. पिकपाणी उतारे आहेत.अशाप्रकारे शेत जमीन विक्री करण्याचा बेकायदेशीर प्रकार हिंदुस्थानात प्रथमच झाला असावा.

आजपर्यंत शासनाच्या ५८ विभागात आमच्या केसेस आम्ही लढवित आहोत. निती आयोगाच्या धर्तीवर स्थापन केलेल्या ‘मित्र’ संस्थेवर सरकारने बांधकाम व्यवसायिक अजय प्रताप अशर यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही अशी भावना झाल्याने, विधिमंडळाचे माजी उपसभापती नरहरी झिरवळ यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे की लोकनेते दि.बा. पाटील यांच्या जयंतीदिनी आम्ही सोनारपाडा येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *