संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
काल शिवसेनेच्या दोन्ही गटांची भाषणे ऐकली नाहीत मुंबईतील दसरा मेळाव्यातली, मी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने व्यस्त होतो अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण आता ऐकले. शिंदेंनी दाखवून दिलं खरी शिवसेना कोणती खरी ते, शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच हे त्यांनी सिद्ध केलं असे फडणवीस म्हणाले. ते विकासाच्या मुद्द्यावर बोलले याबद्दल त्यांचं अभिनंदन असेही फडणीसांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणात शिमगा सोडून काहीच नव्हतं, त्यामुळे शिमग्यावर काही बोलणार नाही असे ते म्हणाले. शिवाजी पार्क पेक्षा बीकेसी मैदान दुप्पट मोठं असून बीकेसी मध्ये प्रचंड गर्दी होती असे त्यांनी स्पष्ट केले.
पुढील निवडणुकांत देखील विधानसभेवर भगवा फडकणार आहे पण तो खऱ्या भाजप-सेना युतीचा फडकणार आहे असे फडणवीस पुढे म्हणाले.
कालच्या शिंदे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजप ची म्हणणाऱ्यांनी स्क्रिप्ट बदलला पाहिजे, ते पुन्हा पुन्हा तेच बोलताहेत. अजित पवार काय म्हणाले मला माहित नाही. पण मूळ सेनेचा विचार बाजूला टाकला सावरकरांवर टीका करणाऱ्यांसोबत गेले म्हणूनच शिवसेनेत फूट पडली असे सांगून मुख्यमंत्री असताना देखील उद्धव ठाकरे कायम पक्ष प्रमुख म्हणूनच बोलले अशी टीका फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.