Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ व्यापार

मनसेत पक्षात शिंदे गटाला विलीन करण्याचा जर प्रस्ताव आला तर विचार करू – राज ठाकरे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर एकूण ४० आमदार शिंदे गटात दाखल झाले आहेत. या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. दुसरीकडे राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले तरी कायद्याच्या कसोटीवर हे सरकार टिकेल का ? अशी विचारणा केली जात आहे. सरकार अबाधित ठेवायचे असेल तर शिंदे गटाला कोणत्या ना कोणत्या पक्षात विलीन व्हावे लागेल, असा दावा केला जात आहे. दरम्यान, शिंदे गटाने मनसे पक्षात विलीनीकरणाचा प्रस्ताव ठेवल्यास त्यावर विचार करू, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

“हे शिवसेनेचे बंडखोर आमदार माझे जुने सहकारी आहेत. याआधीही त्यांनी माझ्यासोबत काम केले आहे. मला याबाबत तांत्रिक माहिती नाही. पण उद्या त्यांच्याकडून तसा प्रस्ताव आला तर मी नक्की विचार करेन”, असे म्हणत माझ्यासाठी प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझा महाराष्ट्र सैनिक असेल बाकी सगळे नंतर येतील, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मी बाळासाहेब ठाकरे यांनाही पत्र लिहिले होते. मी एकच विचारत होतो की, माझे काम काय आहे ? तुम्ही इतरावंर जबाबदारी द्याल आणि मला निवडणुकीच्या भाषणासाठी बाहेर काढणार. माझा शब्द इतरांच्या जीवावर घालणे मला शक्य नव्हते. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा निर्णय होता. महाबळेश्वरला असताना मी म्हणालो की तुमच्या मनात काय आहे ते मला माहीत आहे. उद्धव ठाकरेंना अध्यक्ष करा. पण मला जाहीर करू द्या. कारण राज की उद्धव हा मुद्दा बंद होईल. म्हणून मी विषय बंद केला, असे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिले.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *