Latest News महाराष्ट्र

“येरा – गबाळ्याचे काम नोहे” – अजित पवारांचे फडणवीसांना चोख प्रत्युत्तर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होतेय. यानिमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यातच सरकार कधी बदलायचं हे माझ्यावर सोडा असं विधान त्यांनी केलंय. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं.

अजित पवार म्हणालेत, राजकारणात कोणी मित्र किंवा शत्रू नसतो. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणं म्हणजे खेळ वाटतो का ? हे सरकार पडणारा अजून जन्माला यायचं. हे ‘कोण्या येरा गबाळ्याचं काम नाही’ अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांना फटकारलंय.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *