संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्यातील सरकार हे बोलाची कडी आणि बोलाच भात आहे. कोट्यवधीची घोषणा सरकार करत आणि शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही अजून जमा झाला नाही, हे सरकार धनदांडग्यांचे आहे, गुजरातला मदत करणारे आहे. अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सध्याचे सरकार स्थगितीचे सरकार आहे, यामुळे जनतेच्या कामाचा विकास थांबला आहे. जनतेची कामे लवकरात लवकर झाली पाहिजे अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
तुम्ही सुद्धा काय काय गमावलं हे चेक करा, मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर कसे आले हे चेक करा आणि तुम्ही तुमचे बघा आम्ही आमचं बघू असे खडेबोल सुनावत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्विटला उत्तर दिलंय.
अब्दुल सत्तार ही विकृती आहे, ते कुठेही जातील तिथे असेच वागतील, असा टोला दानवे यांनी सत्तार यांच्या पीए च्या झालेल्या वादावर लागवलाय.