मिरा भाईंदर, प्रतिनिधी: गेल्या अनेक वर्षे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या मिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील कार्यरत शिपाई, मजूर, शिपाई तथा सफाई कामगार, रखवालदार, सफाई कामगार अश्या 21 कर्मचाऱ्यांना अखेर लिपिक टंकलेखक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. वर्षानुवर्षे आपला पदभार सांभाळत उत्कृष्ट कामगिरी करत असताना हे कर्मचारी पदोन्नतीसाठी प्रतिक्षीत होते.
महानगरपालिकेच्या आकृतीबंध व सेवाशर्ती नियमात पदोन्नतीने लिपीक पद भरण्याचे प्रमाण 25% होते. सदरची बाब मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी लक्षात घेत शासनाच्या मंजुरीने पदोन्नतीने लिपीक पद भरण्याचे प्रमाण 40% करून एका अर्थाने गेल्या अनेक वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे.
ज्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली त्यामध्ये सुनिल राठोड, तुकाराम तळपे, श्रीकांत धिवर, सतीश सुळे, प्रवीण गढरी, समीर भोपतराव, भारती सानप, संतोष तिटमे, सुजित घोणे, कुणाल म्हात्रे, फिरोज तडवी, सचिन गोसावी, योगेश चौधरी, दिपक मोहिते, राकेश गायकवाड, दक्षता केंजळे, प्रविण दिवे, नितीन बर्नवाल, आत्माराम तुंगार, माधव होकारणे, ललिता जोजारे या कर्मचाऱ्यांना लिपीक टंकलेखक या पदावर पदोन्नती देण्यात आली. पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड यांनी ही पदोन्नती दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे.
मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांची कामे वेळेत व तत्परतेने व्हावीत या हेतूने आयुक्त यांनी ही पदोन्नती दिली असून त्या सर्व पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांकडून जनतेची कामे इमानेइतबारे केली जातील अपेक्षा देखील व्यक्त केली आहे.